Blogs

आषाढी वारी: भक्ती, शक्ती आणि समतेचा महासंगम (जगात भारी!)

​"माऊली... माऊली..." चा गजर, डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या माऊली, हातात टाळ-मृदंग घेऊन तल्लीन झालेले वारकरी आणि कपाळावर बुक्क्याचा टिळा... हे दृश्य डोळ्यांसमोर आलं की एकाच शब्दाची आठवण होते—आषाढी वारी! ​म्हणूनच म्हणतात ना, "आषाढी वारी, जगात भारी!" कारण अशी वारी आणि भक्तीचा असा अथांग सागर संपूर्ण जगात कुठेच पाहायला मिळत नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पंढरीची वारी हे समीकरण विठ्ठल आणि रखुमाई इतकेच अद्वैत आहे. देहू गावाहून निघणारी संत तुकाराम महाराज पालखी आणि आळंदी मधून निघालेली माऊलींची पालखी त्यांचे अभंग, वारकऱ्यांसाठी वारीच्या वाटेवरील सर्वात मोठी शिदोरी आहेत. १. पंढरीची ओढ आणि माहेरचा दृष्टांत ​दरवर्षी आषाढ महिना जवळ [...]

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य आणि आधुनिक काळातील प्रासंगिकता

"इतिहास केवळ वाचायचा नसतो, तर तो वर्तमानात जगायचा असतो आणि भविष्यासाठी घडवायचा असतो," हा विचार प्रत्यक्षात आणणारे लोकराजे म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज! २६ जून हा या क्रांतीसूर्याचा जयंती दिन. हा दिवस केवळ एक सण किंवा उत्सव नाही, तर सामाजिक न्याय आणि समतेच्या विचारांची उजळणी करण्याचा दिवस आहे. माझे हे पूर्वजन्मीचे संचितच म्हणावे लागेल की, ज्या राजाने बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपले आयुष्य वेचले, त्यांनी १९२२ मध्ये संकल्पना मांडलेल्या आणि पुढे १९३२ साली पुण्यात साकारलेल्या 'ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी'च्या (AISSMS) 'श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज'मध्ये मला आज प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करण्याची संधी मिळाली आहे. या [...]